
वर्धा : यंदाचा पावसाळा वर्धा जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम असे तब्बल सात प्रकल्पांनी शतक गाठले असून त्यापैकी पाच प्रकल्पांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, प्रकल्प परिसरात निसर्गरम्य धबधबे, प्रवाह, व मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची जलाशयांकडे मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.