अकोला : देशातील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी आरोग्य यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असतानाचा, संपूर्ण देशाच्या पोषणाची जबाबदारी शेतकरी बांधव समर्थपणे पार पाडत आहेत. परंतु, ही जबाबदारी पार पाडत असताना, शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोरोनाचे संकट निवारण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे अन्न निर्मितीचे कार्य देशाचा पोषिंदा शेतकरी अखंडपणे करीत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणे एवढीच कदाचित त्याहूनही अधिक महत्त्वाची, अशी देशाच्या पोषणाची जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना, शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादनापासून ते बियाणे खरेदी-विक्री, शेतमाल खरेदी-विक्री, हाताळणी, वाहतूक, पैशाची देवान-घेवान, पॅकेजींग करताना, योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली आखरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
खरीप पेरणीकरिता बियाणे वापरताना घ्या काळजी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.