

Yavatmal News
sakal
वणी (जि. यवतमाळ) : शहरालगत गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरीया वसाहतीत बुधवारी भूस्खलन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या भूस्खलनामुळे नदीकाठावर बांधलेली संरक्षण भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आली असून, त्याचा थेट धोका शेजारील पाच मजली इमारतीला निर्माण झाला आहे.