

Latur
esakal
लातूर: पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या लातूरकरांना सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. शहरातील तापमान कधी ३७ तर कधी ३८ अंशांवर आणि औराद शहाजनीचे तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावर पोचले आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने लातूरकर त्रस्त झाले आहेत. पावसापासून संरक्षण घेण्याच्या महिन्यात हवामान बदलांमुळे उन्हापासून संरक्षण घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.