‘जाचक कायदेच’ शेतकरी आत्महत्यांचे मूळ; वाचा कोण म्हटले असे

farmer washim.jpg
farmer washim.jpg

रिसोड (जि.वाशीम) : इंग्रज काळापासून असलेले शेतकरी विरोधी कायदे स्वातंत्र्यांच्या सत्तरीनंतरही कायम आहेत. परिणामी, देशात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. सदर शेतकरी विरोधी कायदेच शेतकरी आत्महत्येचे मुळ आहे, असे प्रतिपादन ‘किसानपूत्र’ शेतकरी चळवळीचे नेते अमर हबीब यांनी केले. रिठद येथे गुरुवारी (ता. 20) रोजी ‘शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

या कार्यक्रमाल प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, आयोजक उत्तमराव आरू, सुभाष शिंदे, देवा इंगोले, सुभाष बोरकर, डॉ. जितेंद्र गवळी, आत्माराम आरु, संतोष सुर्वे, दीपाली बोरकर, गजानन आरु, नंदकिशोर आरु, विठ्ठलराव आरु आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना हबीब म्हणाले की, शिवछत्रपतींच्या काळात शेतकरी समृध्द व सुरक्षित होता. मात्र त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी भूमिका कायम शेतकरी विरोधी राहिली. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा कलंक महाराष्ट्रासह देशाची भाळी लागला. 

शेतकऱ्यांचे राजे शिव छत्रपतींच्या धोरणांच्या अंमलबजावणीसोबतच आताचे जाचक कायदे बदलण्यासाठी संघटित लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय बळीराजाला आत्मबळ देण्यासाठी ता. 19 मार्चच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाला भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रिठदसह परिसरातील गावखेड्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष आरु, रवी आरु, ज्ञानेश्वर जुमडे व गावकऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com