
कोंढाळी : येथून १५ किमी अंतरावरील अडेगाव बोर अभयारण्याला लागून असलेल्या खापा धोतीवाडा गावातील शांताबाई ज्ञानुजी राठोड यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या ७० हजार रुपये किंमतीच्या पाच बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले, तर त्यातील एक बकरी घेऊन पसार झाल्याची घटना बुधवारी (ता.२) मध्यरात्रीनंतर घडली. शेतकरी, शेतमजूर व नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत.