विजेच्या लंपडावाने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ त्रस्त

vijecha lapndav.
vijecha lapndav.
Updated on

नांदुरा (जि. बुलडाणा) : परतीच्या अवकाळी पावसाने खरिपातील सर्वच पिकांचा शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्याने शेतकरी कमालीचा आर्थिक संकटात सापडला असताना, किमान रब्बी हंगामातील पीक हाती लागावी या विचारातून त्याने इकडून-तिकडून उसनवारी करीत आपल्या शेतात गहू, हरबरा हिवाळी मका यासह रब्बीच्या पिकांची पेरणी केली. मात्र, या रब्बी पिकांना खाने को है लैकिन पिने को नही है. असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. महावितरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावासह शेतामध्ये वीज केव्हाही जाते आणि केव्हाही येते व लोडशेडिंग व्यतिरिक्त मध्येच एक-दोन तास वीज पुरवठा खंडित केला जातो. अशीच परिस्थिती गेल्या कित्येक दिवस राहिल्याने रब्बीचा सगळा हंगाम संकटात सापडला असल्याचे चित्र निर्माण झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

निसर्ग जगू देईना अन् महावितरण पोट भरू देईना
शेतीसाठी एक आठवडा दिवसा आठ तास व एक हप्ता रात्री दहा तास या महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलिटी कमीशन (एमईआरसी) यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शेतीसाठीचा विजपुरवठा सुरू असतो. मात्र, या वेळापत्रकातही कधी वीज गुल होईल आणि कधी येईल याचा काही भरोसा नसतो. महावितरणाच्या या नियोजन शून्य कारभारात शेतकऱ्यांचे मात्र हाल झाले आहे. अगोदरच शेतकरी अवकाळी पावसाने आर्थिक संकटात सापडलेला असताना खरिपासारखीच रब्बीही हातची गेल्यात जमा आहे. वास्तविक अवकाळी पावसाने सर्वत्र पाणी असताना महावितरणाच्या वेळापत्रकात मात्र बाकी 16 तास वीज पुरवठा का बंद केला जात आहे? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत असून, परतीच्या मुबलक पडलेल्या पावसाने तालुक्यातील सर्वच जलसाठे पुरेपुर भरलेले असून, जिकडे-तिकडे पाणीच पाणी असताना केवळ वीज अभावी रब्बीच्या गहू, हरभरा, मका, भुईमूग, ऊस, पपई आदी पिकांना पाणी वेळेवर मिळत नाही आहे. त्यामुळे रब्बीचे पिके कोवळी असताना त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी ही पिके खाली झूकत असून, गत काही दिवासापासून शेतकऱ्यांना निसर्ग जगू देईना अन् महावितरण पोट भरू देईना असे शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ आली आहे.

वीज वितरण जबाबदार ठरणार
महावितरण राबवित असलेले भारनियमन तसेही शेतकऱ्यांसाठी मारकच ठरले आहे. पण त्याही व्यतिरिक्त वीज देण्याच्या काळातही दहा-दहा मिनिटातून वीज गायब होते. म्हणून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे पिके सुकून गेल्याने यावर्षी रब्बीचे उत्पादन नगण्य मिळणार आहे. याकरिता झालेल्या रब्बीच्या नुकसानीकरिता वीज वितरण जबाबदार ठरणार आहे.
-श्रीकृष्ण जुनारे, शेतकरी 

रोहित्राची बिघाडी अन् वर्गणीतून दुरुस्ती
अगोदरच विजेचे भारनियमन. त्यात सर्वच विहिरींना पाणी यामुळे अतिरिक्त दाब वीज रोहित्रांवर वाढत गेल्याने रोजच रोहित्राची बिघाडी होत गेली. संबंधित यंत्रणा मात्र दुरुस्तीच्या नावावर एक दमडीही देत नसल्याने शेतकऱ्यांनी वर्गणी करून ही महावितरणची रोहित्र जपली असतानाही थेट वीज जाणे-येणेच्या कारणातून पाणी न देऊ शकल्याने रब्बी हातची गेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com