Crop insurance trigger activated but no payout
esakal
अमरावती : गत खरीप हंगामात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर लागू झाल्यानंतरही पीकविम्याचा एकही रुपया अद्याप मिळालेला नाही. पीककापणी प्रयोगावर आधारित पीकविमा योजना लागू केल्याने शेतकऱ्यांना परताव्यासाठी केवळ एकच ट्रिगर लागू होणार आहे. जिल्हा कृषी विभागाने उत्पादनाची सरासरी कळविल्यानंतरही विमा परताव्यासाठी शब्दही निघत नसल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे.