
कोदामेंढी (मौदा) : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी महत्त्वाची ठरणारी ‘थ्री फेज’ वीज कनेक्शन देण्याची महावितरणची पारंपरिक योजना २०१८ पासून बंद करण्यात आली. त्यामुळे बरेच शेतकरी अडचणीत आले असून, आता महावितरण कंपनी आणि शासनाकडून सोलर पंप योजना स्वीकारण्याची अप्रत्यक्ष सक्ती करीत असल्याचे दिसत आहे.