गावातील रस्त्यांवर दिसणार अंधार, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची महावितरणवर वेळ

MSEB will cut power if grampanchayat and corporation not pay electric bill in chandrapur
MSEB will cut power if grampanchayat and corporation not pay electric bill in chandrapur

चंद्रपूर : शहरी, ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलांची नगरपालिका आणि ग्रामपंचायतींकडे तब्बल 52 कोटी 72 लाख थकीत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांना वीज देयक अदा करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. आता या नोटीसची मुदत संपली आहे. त्यामुळे पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात अनेक गावातील रस्त्यांवर अंधार बघायला मिळणार आहे. 

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक , शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांची थकबाकी 137 कोटी 29 लाखाच्या घरात पोहोचली. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडून 58कोटी 14 लाख येणे आहे. वाणिज्यिक ग्राहकांकडून 11 कोटी 38 लाख येणे आहे. औद्योगिक ग्राहकांकडून 5 कोटी 51 लाख थकबाकी वसुली येणे आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे 4 कोटी 72 लाख तर सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडे 4 कोटी 78 लाख थकीत आहे. शहरी आणि ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायत मिळून तब्बल 52कोटी 72 लाख वसुली होणे बाकी आहे. यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून संदेश तसेच नोटीस देण्यात आल्या आहेत. आता नोटीसची मुदतही संपली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबत आता पाणीपुरवठा योजना, पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास याचा सामान्य माणसाला होणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत वीजबिल त्वरित भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले.

फेब्रुवारी 2021 अखेर राज्यात एकूण 72 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. टप्प्या टप्प्याने वीज बिल भरण्याची सुविधा त्यांना देण्यात आली. या काळात महावितरणचे कर्मचारी अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झटत होते. थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्‍य होत नसल्याने,वीजपुरवठा करण्यास कर्ज घेऊन वेळोवेळी वीजपुरवठा करावा लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com