
नागपूर : राज्यातील बारा गैरकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या २ हजार ५३४ पदांपैकी तब्बल १ हजार ३६८ म्हणजेच ४७ टक्के पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने ६६९ पदे भरण्यासाठी २०१९ मध्ये मान्यता असतानाही यातील एकही पद भरण्यात आले नाही. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्ज केल्यानंतर ही धक्कादायक स्थिती समोर आली.