Nagpur : खाप्‍यातील प्रशासक राज कधी संपणार?

वर्षे लोटूनही निवडणुका नाही; शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष
administrator rule in Khapa Demand for immediate election
administrator rule in Khapa Demand for immediate electionesakal
Updated on

खापा : आरक्षणाचा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत प्रशासक राज चालणार आहे. मात्र, येथीस समस्या सोडविण्यास प्रशासक राज कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे प्रशासक राज कधी संपणार,असा प्रश्न शहरातील नागरिक विचारीत आहेत. तातडीने निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

येथील नगर पालिकेतील नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ संपल्याने येथील सर्व पदाधिकारी आता माजी झाले आहेत.नगरपालिका सदस्यांचा कार्यकाल संपल्याने येथील कारभार प्रशासक म्हणून सावनेर येथील उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

खापा नगर पालिकेवर आता प्रशासक राज आहे. इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी आरक्षणाच्या तिढा सुटला नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. खापा नगरपालिकेचा आठ फेब्रुवारी २०२२ ला कार्यकाळ संपला आहे.

येथील पालिकेचा कार्यकाळ एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असताना अजूनही नगरपालिकेच्या निवडणूका झाल्या नाहीत. कार्यकाळ संपताच एक-दोन महिन्यातच निवडणुका होईल, अशी सर्वांनाच आशा होती. यावरून आजी-माजी नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. नागरिकांची भेटीगाठी सुरू करण्यात आल्या होत्या.

पण ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर गेल्याने आजी-माजी नगरसेवकांच्या हिरमोड झाला असल्याचे दिसून येते. ओबीसी आरक्षणाच्या तिढा अद्याप सुटला नसल्याने निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकीला सध्या स्थगिती दिली आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून यावर न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर लगेचच निवडणुका घोषित करण्यात येईल, असे चित्र दिसून येत आहे. निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे नवयुवक तसेच राजकीय पुढाऱ्यांचे निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खापा नगरपालिकेवर एक सव्वा वर्षापासून प्रशासक असल्याने येथील विकास कामांची गती मंदावली आहे.अपुरे कर्मचारी व प्रभारी मुख्याधिकारी यामुळे नगरपालिकेच्या विकास कामावर याचा विपरीत परिणाम होत आहे. खापा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांची मौदा नगरपंचायतीला बदली झाली आहे.

तसेच महादुला नगरपंचायतीचा पण त्यांचेकडे कार्यभार आहे.येथील मुख्याधिकाऱ्यांना तीन नगरपंचायतीच्या कारभार सांभाळावा लागत आहे. नागरिकांच्या अनेक समस्या असल्याने नगरपालिकेत गेले असता येतील प्रभारी मुख्याधिकारी उपस्थित राहत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.

कर्मचाऱ्यांवर वचक नाही

कर्मचारी ही उपस्थित राहत नाही.कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही.कर्मचारी जबाबदारीने काम करत नाही.समस्या सांगायच्या कुणाला?, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नगरसेवक होते, तेव्हा वॉर्डातील समस्या त्यांच्याकडे मांडत होते. त्यांनी नाही ऐकले तर नगराध्यक्षाकडे जायचे. पण आता नगरसेवक नाही व नगराध्यक्ष ही नाही. त्यामुळे समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

रस्त्यावरील सांडपाणी, दुर्गंधीमुळे त्रस्त

निवडणूक लांबल्याने नगर पालिकेवर प्रशासकीय राजवट आणखी काही महिने कायम राहणार आहे. शहरात अनेक समस्या आहे. नळाला गढूळ पाणी येत असल्याने तसेच भरलेले चेंबर व रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, विकास कामांकडे दुर्लक्ष आदी समस्या आहेत. नागरिकांच्या या समस्यांबाबत नुकताच नगरपरिषद कार्यालयावर नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. नागरिकांच्या समस्यांकडे नगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com