

Nagpur News
esakal
नागपूर: राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान तीन पेपरही फुटले होते. दरम्यान गोंदिया आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात जीवशास्त्राच्या पेपरदरम्यान ‘मास कॉपी’ केल्याचे २४३ विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत उघडकीस आले.
या विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.