मुनगंटीवार म्हणाले, सरकारला श्रेय व खुर्चीशिवाय काही दिसत नाही

मुनगंटीवार म्हणाले, सरकारला श्रेय व खुर्चीशिवाय काही दिसत नाही

नागपूर : टाटा कॅन्सर रुग्णालयाला शंभर सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता. यामुळे वाद विवाद होत आहे. या वादात भाजपचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेतली आहे. कॅन्सरच्या रुग्णांसाठी जी घरे दिली, त्यामध्येही या सरकारमधील लोकांनी श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे. हे सरकार भूमिका बदलणारे सरकार आहे. यांच्या भूमिका येवढ्या वेगाने बदलतात की सरडा सुद्धा आत्महत्या करेल. सरडा जसा रंग बदलतो, तसे हे सरकार भूमिका बदलतात, असेही ते म्हणाले. (BJP-minister-Sudhir-Mungantiwar-accuses-the-government)

टाटा रुग्णालयात उपचारासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येतात. त्यांच्या नातेवाइकांना राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या शंभर खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. चौधरी यांच्या तक्रारीवर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली होती.

मुनगंटीवार म्हणाले, सरकारला श्रेय व खुर्चीशिवाय काही दिसत नाही
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे चांगलेच जमते. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची भाष्य करीत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी असे विधान केलेले नाही. मात्र, गृहनिर्माण विभागाने कॅन्सर रुग्णांसाठी दिलेल्या शंभर खेल्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेच्याच नेत्याने याबाबत तक्रार केली आहे. या वादावरून क्षेयवादाची लढाई सुरू असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हाणाले.

मी मोठा ही भावना महाविकास आघाडीत निर्माण झाली आहे. या सरकारने एखादा चांगला निर्णय घेतला तरी तू-तू, मै-मै होते. या सरकारला श्रेय आणि खुर्चीशिवाय काहीही दिसत नाही. हे कलियुगाचे नवीन टाइपचे अर्जुन आहेत. अर्जुनला चिमणीचा फक्त डोळा दिसायचा या सरकारला फक्त खुर्ची दिसते. यांच्या आदर्शावर कुणीही जाता कामा नये. अशा पद्धतीने निर्णय बदलणे हे गैर, असेही मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले, सरकारला श्रेय व खुर्चीशिवाय काही दिसत नाही
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

सरकार रंग बदलते

कॅन्सरच्या रुग्णांसाठी जी घरे दिली, त्यामध्येही या सरकारमधील लोकांनी श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे. हे ईश्वरी कार्य आहे. येथेही हे लोक अशी भांडणे करतील, असे वाटले नव्हते. सरडा जेवढ्या वेगाने रंग बदलत नाही, तेवढ्या वेगाने हे सरकार रंग बदलते, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आज म्हणाले.

(BJP-minister-Sudhir-Mungantiwar-accuses-the-government)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com