Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Fadnavis Targets Pawar: फडणवीस म्हणाले, ‘‘नुसती यात्रा काढून चालणार नाही तर ओबीसींच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे आहात हे कधीतरी दिसू द्या. ज्यावेळी ओबीसींवर संकट येते, त्यावेळी मात्र, विरोधकांची भूमिका ‘नरो वा, कुंजरो वा’ असते. हे ओबीसींनी बघितले आहे.
CM Devendra Fadnavis delivers a sharp political jibe at Sharad Pawar over OBC issues and Mandal Yatra memories.
CM Devendra Fadnavis delivers a sharp political jibe at Sharad Pawar over OBC issues and Mandal Yatra memories.Sakal
Updated on

नागपूर: ‘‘ओबीसींची शक्ती काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितले. कोणत्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाही. ओबीसी समाजासाठी त्यांनी केवळ भाषणाचे राजकारण केले. ओबीसी समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर विरोधक मंडल यात्रा काढत आहेत,’’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेला नुकतीच येथून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com