आशिष देशमुखांचा सरकारला घरचा आहेर, राज्यात आणीबाणी लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

ashish deshmukh
ashish deshmukhe sakal
Updated on

नागपूर : मागील एक वर्षात शासनाकडे वेळ होता. त्यांना राज्यातील प्रत्येक शहरामध्ये जम्बो हॉस्पीटल उभे करता आले असते. मला वाटते राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. संविधानातील कलमानुसार आपण आणीबाणी लागू करू शकतो. आरोग्य आणि आर्थिक संदर्भातील ही आणीबाणी केंद्र सरकारने महाराष्ट्रात लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

ashish deshmukh
कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

दोन महिन्यासाठी ही आणीबाणी असेल. त्यानुसार लोकांचे जीव वाचविता येतील. लता मंगेशकर हॉस्पीटल माध्यमातून मागील वर्षी जवळपास तीन ते साडेतीन हजार रुग्ण आम्ही वाचवू शकलो. आज परिस्थिती अशी आहे, की ज्यांची ओळख आहे त्यांचेच जीव वाचत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचेच जीव वाचतात. आता ग्रामीण भागात कोरोना शिरलाय. मात्र, राज्याकडून त्यांना सुविधा पुरविल्या जात नाहीत, असाही आरोप आशिष देशमुख यांनी केला.

दोन महिन्यासाठी देशाच्या ठराविक भूभागामध्ये संविधानातील३६० कलमाद्वारे आणीबाणी लावण्यात यावी. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. या आणीबाणीच्या काळात तो त्यांना मिळेल. त्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur News
Nagpur News
Nagpur News
Monsoon Update imd prediction
Marathi News Esakal
www.esakal.com