
नागपूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विविध योजना असल्या तरी गळती मात्र थांबण्याचे नाव गेल्या नाही. मागील वर्षी तर पहिलीत दरवर्षीच्या तुलनेत ८१४ विद्यार्थी कमी आले. पाचवीपासून ते आठवीपर्यंतची गळती बघितल्यास सरकारचे लक्ष कुठे आहे, असा प्रश्न पडतो. सातव्या वर्गातून ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी टीसी काढली.