

Maharashtra Government Advances Maratha Reservation CM Fadnavis Assures Dialogue on Pending Issues and Reforms
sakal
नागपूर: महायुती सरकारने मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन ते प्रत्यक्ष अमलात आणले आहेत. मागणी केलेल्या बहुतांश लोकांना जात प्रमाणपत्रे मिळाली असून प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण नगण्य आहे. तरीही कोणाचा रोष असल्यास चर्चेतून नक्कीच मार्ग काढू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.