

Nagpur
esakal
नागपूर: पूर्व विदर्भात खरीप हंगामात आतापर्यंत ५८.५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. यंदा पाऊस लांबल्याने पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे सांगितले जात आहे. पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. आतापर्यंत केवळ २१ टक्के क्षेत्रावरच रोवण्या झाल्या आहे.