
जलालखेडा : नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून एकाच आठवड्यात तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भारसिंगी येथील शेतकरी निरंजन शेषराव राऊत (वय ५३, भारसिंगी) या शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.