
Nagpur Farmers
sakal
नागपूर: शेतकऱ्यांसाठी शासनाने योजना आखल्या मात्र त्या सर्व कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. नागपूर विभागात गत ८ महिन्यात २९६ आत्महत्येच्या नोंदी झाल्या आहेत. दर दोन दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आकडेवारावरून स्पष्ट होत आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव असून सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्याबाबत अनास्था असल्याचे चित्र आहे.