

Nagpur News
esakal
सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची नेहमीच नाचक्की झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांंना त्याचा लाभ कधी मिळेल हे सांगता येत नाही. काही दिवसांत शेती हंगाम सुरू होईल. शेतकरी शेतीची मशागत करतील. त्यानंतर पेरणीसाठी आवश्यक साहित्य आणि पैशाची जुळवाजुळव करेल. प्रत्येक वर्षीचा शेतकऱ्यांचा नित्यक्रम. मात्र, यंदा शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसून येते. सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण एकाच वेळेस येत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गळचेपी होते.