हरभरा, गहू पिकांवर ‘संक्रांत’ येण्याची भीती; ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतातुर

Farmers worried due to cloudy weather in Nagpur rural
Farmers worried due to cloudy weather in Nagpur rural

गुमगाव (जि. नागपूर) : यावर्षी सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरातील बंधारे, विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन हातातून गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. सध्या ही पिके जोमात आहे. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आणि तुरळक प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाच्या ‘एन्ट्री’ने शेतकरी चिंतातुर झाले आहे.

यंदा हिंगणा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी सोबतच सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले. मात्र, यावर्षी अस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीमोल झाले. हाती काहीच मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी कापणीच टाळली. शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन न कापता त्यावर थेट ट्रॅक्टर चालवले. काहींनी रोटावेटर मारला.

सोयाबीन हातातून गेलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या शेतात हरभरा आणि गव्हाची पेरणी केली आहे. खरिपातील सोयाबीनकडून निराशा मिळाल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामातील हरभऱ्याकडून अपेक्षा ठेवून असतानाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचे ‘ढग’ कायम असल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामात सुद्धा नुकसानच होण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतातील पिकांची स्थिती आणि हवामानातील बदल लक्षात घेता कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com