Bio CNG production from water hyacinth
esakal
नागपूर : “जलपर्णी पुन्हा वाढता कामा नये. वाडी एमआयडीसीतून दूषित पाणी येत असेल तर त्याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे,” असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर महापालिकेच्यावतीने अंबाझरी तलाव येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गडकरी बोलत होते. अंबाझरी तलाव हे नागपूरचे वैभव असून त्याचे संवर्धन करतानाच शहराच्या विकासाला पर्यावरणाची जोड देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.