राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर नागपूरात पार पडले. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अजित पवारांनी आपल्या गटातील नेत्यांचे कानही टोचले. या बैठकीत कार्यकर्ते-नेत्यांचे गट करून चर्चा करण्यात आली. पक्ष वाढीसाठी अजित पवार गटाचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूरातून रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चिंतन करण्याची खरी गरज असल्याची चर्चा सुरू आहे.