

Nagpur
esakal
नागपूर: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ताज्या ‘स्ट्राईड्स २०२६’ अहवालानुसार, देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या ‘क्रिटिकल टायगर हॅबिटॅट’ (गाभा क्षेत्र) मधून आतापर्यंत २९८ गावे आणि ३२ हजारांहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात अनुक्रमे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’तून २९ गावातील २, ०५६ कुटुंबे आणि मेळघाटमधून २५ गावांमधील ४, ७११ कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.