
नागपूर : राज्यातील कापूस खरेदी केंद्रांबाबत शेतकऱ्यांच्या नेहमी तक्रारी असतात. कापसासाठी राज्य शासन आणि भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) निश्चित असे धोरण नाही. त्यामुळे राज्यातील कापसाचे पीक कमी होत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीराम सातपुते यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही खंत व्यक्त केली.