

Nagpur Bench Quashes Dowry FIR, Warns Against Misuse of Law in Family Disputes
esakal
नागपूर - कौटुंबिक वादविवादांनंतर सासरच्या नातेवाईकांना बनावट गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची प्रवृत्ती सध्या वेगाने वाढत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. अशा घटनांमुळे सासरच्या सदस्यांना दीर्घकाळ मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळते आणि ही हानी कधीही भरून निघू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.