

Nagpur Water Storage
esakal
नागपूर: पावसाळ्या उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील लघुसिंचन तलावांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ४०८ लघुसिंचन तलावांमध्ये सध्या केवळ ३० टक्केच पाणीसाठा असल्याने आगामी काळात सिंचनासोबतच मासेमारी व्यवसायाला फटका बसून जिल्हा परिषदेच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.