Nagpur : बाबासाहेबांच्या प्रतिज्ञांची पुन्हा उजळणी आवश्‍यक

बुद्धाचे तत्त्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे
Nagpur
Nagpur sakal

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती अखिल विश्वात पोचली आहे. बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा तथागताच्या धम्माची आहे. धम्माची दीक्षा ही आचरणाची दीक्षा आहे. समतेची दीक्षा आहे. याच दीक्षेच्या आधारावरच उद्याचा भारत उभा आहे. पुन्हा एकदा पंचशील आणि २२ प्रतिज्ञांची उजळणी करुया आणि उद्याचा भारत निर्माण करुया, असा संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

दीक्षाभूमीवर आयोजित ६६ व्‍या धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्याच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. डॉ. कमल गवई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते. बुद्धाचे तत्त्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे. बुद्धाने दिलेले पंचशीलाचे तत्त्व विश्वाच्या कल्याणाचे आहे. हाच धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी या देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून दिला.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com