Nagpur: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा गाजावाजा, पण दीड महिना उलटूनही मिळेना नुकसानभरपाई, सरकारचं दुर्लक्ष

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मुख्यमंत्र्यांनी वाढीव दराने मदत देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात नागपुरात सरकारने केली होती. आज दीड महिने होत असताना अद्याप मदत मिळालेली नाही.
Nagpur: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा गाजावाजा, पण दीड महिना उलटूनही मिळेना नुकसानभरपाई, सरकारचं दुर्लक्ष

Nagpur Agriculture loss Aid: अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मुख्यमंत्र्यांनी वाढीव दराने मदत देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात नागपुरात सरकारने केली होती. आज दीड महिने होत असताना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यातच आता झालेल्‍या अवकाळी पाऊस व गारपिटीनेही पिकांचे नुकसान केले आहे. मागील नुकसानाचीच मदत मिळाली नसल्याने ही केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे.

वर्ष २०२३ च्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन पिकाचे सर्वाधिक मोठे नुकसान झाले. पीक विमा मंजूर करण्यात आला. दिवाळीपूर्वी विम्याची २५ टक्के अग्रीम देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु रक्कम मिळाली नाही. त्यानंतर कापसावर लाल्या रोग आला.

त्यामुळे हातात आलेले पीक गेले. त्यानंतर अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारपेक्षा वाढीव दराने मदत देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली.(Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या मदतीचा शासन आदेश काढण्यासाठी २० दिवस लागले. त्यानुसार तालुकास्तरावरून नुकसानीबाबतचे सुधारित प्रस्ताव मागवण्यात आले. विभागीय आयुक्तांनी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हे प्रस्ताव पाठवून आज पंधरा दिवस आहे. परंतु अद्याप नुकसान भरपाईची मदत आली नाही.

Nagpur: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा गाजावाजा, पण दीड महिना उलटूनही मिळेना नुकसानभरपाई, सरकारचं दुर्लक्ष
Share Market Today: आज शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी; तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

शनिवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. एकीकडे नुकसान होत असताना दुसरीकडे मालाला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ती केव्हा मिळेल, असाच प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

अशी मिळणार मदत

जिरायत - १३,६०० रुपये

बागायत -२७,००० रुपये

बहुवार्षिक - ३६,००० रुपये

(३ हेक्टरच्या मर्यादेत मिळणार मदत)

Nagpur: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मदतीचा गाजावाजा, पण दीड महिना उलटूनही मिळेना नुकसानभरपाई, सरकारचं दुर्लक्ष
Maharashtra Weather Update: अवकाळीमुळे बळीराजा पुन्हा संकटात; विदर्भात गारपिटीने पिके आडवी, आज 'येलो अलर्ट'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com