Anil Deshmukh Questions Govt Over No Action in SBL Energy Blast
esakal
नागपूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे ४७ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नागपूर जिल्ह्याची ओळख 'टायगर कॅपिटल' म्हणून आहे, परंतु दुर्दैवाने आता जिल्ह्याची ओळख 'स्फोटांची राजधानी' म्हणून होणार का? अशी विचारण करू माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या तपासावर चिंता व्यक्त केली.