

Nagpur News
esakal
नागपूर: भारताच्या पायाभूत सुविधा विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या ५७७ किलोमीटर लांबीच्या ‘नागपूर-विजयवाडा एक्सप्रेस-वे’च्या कामाला वेग आला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच आढावा घेतला. २०२७ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.