
राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपूरात हलबा महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजानंतर आता बंजारा, धनगर आणि वंजारी समाज आरक्षणासाठी लढत आहेत. यामुळे राज्य सरकारवर देखील ताण निर्माण झाला आहे.