
नागपूर : व्ही.पी. सिंग यांच्या सरकारच्या मंडल आयोगाला सरकारमध्ये असलेल्या तत्कालीन भाजप नेत्यांनी विरोध दर्शवत कमंडल यात्रा सुरू केली होती. त्यावेळी देशात प्रचंड संघर्ष झाला होता. महाराष्ट्रात आपण मुख्यमंत्री असल्याने मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्याकडे होती.