पेरणीचा सोयाबीन ११५ रुपये किलोंवर; आर्थिक गणितच कोलमडले

पेरणीचा सोयाबीन ११५ रुपये किलोंवर; आर्थिक गणितच कोलमडले

नागपूर : मागच्या वर्षी ७५ ते ८२ रुपये किलोने मिळणारे सोयाबीनचे (soybean) बियाणे यावर्षी चक्क ११५ रुपये किलोने मिळत आहे. पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांमध्ये मोठी भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले (The economic math of the farmers collapsed) आहे. दुसरीकडे सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याला चार ते पाच हजार भाव मिळत असल्याने पेरणी करावी किंवा नाही, या विवंचनेत शेतकरी आहे. (soybean-price-at-Rs-115-per-kg)

विदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला मान्यता मिळाली. शेतकऱ्यांनी विविध उपाय करून भरपूर उत्पादनही घेतले. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत पिकाला भाव मिळत नसल्याने काही वर्षांत हे पीक शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी अवस्था पिकाची झाली. सध्या पेरणीचा मोसम सुरू आहे. सोयाबीनचे बियाणे ११५ रुपये किलोग्रॅमप्रमाणे बाजारात मिळत आहे.

पेरणीचा सोयाबीन ११५ रुपये किलोंवर; आर्थिक गणितच कोलमडले
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

अनेक कंपन्यांचे बियाणे बाजारात विक्रीला आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठी भाववाढ केली. मागील हंगामात ७२ ते ८२ रुपये किलोग्रॅमप्रमाणे बियाण्यांची विक्री झाली. ३० किलोची बॅग २ हजार ४६० रुपयांना मिळायची. ती आता ३ हजार ४५० रुपयांना मिळत आहे. जवळपास ३५ रुपये एका किलोग्रॅमवर वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे पीक घ्यायचे किंवा नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे. महत्त्वाचे म्हणजे क्विटंलवर ३ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

१६ लाख ५० क्विंटल बियाण्यांची गरज

राज्यात सर्व प्रकारच्या १६ लाख ५० हजार क्विटंल बियाण्यांची गरज असते. त्यात १५ टक्क्यांवर बियाणे हे सोयाबीनचे असते. कपाशीनंतर सर्वाधिक पसंती या पिकाला आहे. शेतकरी हे पीक नगदी पीक म्हणून बघतात हे विशेष.

सोयाबीनचा उतारा फक्त चार क्विटंलवर

शेतकऱ्यांचे हे पीक आता त्यांच्यासाठी नकोसे झाले आहे. गेल्या वर्षी फक्त हेक्टरी तीन ते चार क्विटंल उत्पादन झाले. शेतकऱ्यांसाठी हा मोठा फटका होता. शासकीय अंदाजानुसार सोयाबीन पिकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी व्हायला पाहिजे. नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ३.८१ क्विंटल हेक्टरी उत्पादन झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले.

पेरणीचा सोयाबीन ११५ रुपये किलोंवर; आर्थिक गणितच कोलमडले
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला

  • १०० ते ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा

  • पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक आणि जैविक प्रक्रिया करा

  • पेरणी टोकण किंवा रुंद वरंभा सरी पद्धतीने करा

  • वरील पद्धतीने पेरणी केल्यास एकरी पाच ते सहा किलो बियाण्यांची बचत होते

(soybean-price-at-Rs-115-per-kg)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com