नागपूर - राज्यात वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर पाच बिबट्यांची नसबंदी करून पुढील तीन वर्षे परीक्षण करण्यास अनुमती दिली आहे..मात्र, ही संख्या अत्यंत अपुरी असून, पाच नव्हे तर पाचशे बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता. ९) रोजी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली..मुनगंटीवार म्हणाले, राज्यात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केवळ पाच बिबट्यांवर प्रयोग करून उपयोग होणार नाही..मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या एका शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन केंद्राला पाचशे बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी करायला हवी. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यापूर्वी छोट्या स्वरूपात करण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचा उल्लेखही त्यांनी केला. या प्रयोगाचे यश पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये त्याचे कौतुक केले होते..आता हेच तंत्रज्ञान राज्यभर वापरले पाहिजे. आवश्यकता भासल्यास लष्कराकडे असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाघ, अस्वल आणि बिबट्यांसारखे आक्रमक वन्यप्राणी शोधणे सुलभ करता येईल, असे ते म्हणाले..त्यांनी वनविभागातील प्रशासकीय अडचणींकडेही सरकारचे लक्ष वेधले. प्रायमरी रेस्क्यू टीमला मागील वर्षभर निधी मिळालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील रोजंदारी वनमजुरांचे सहा महिन्यांपासून मानधन थकीत आहे. हे पैसे तातडीने द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.