Teachers Relief
esakal
नागपूर : वरिष्ठ कार्यालयीन पातळीवरून सातत्याने दिवसभरात विविध प्रकारची माहिती शालेय शिक्षकांकडून मागविली जाते. त्यामुळे शिक्षकांना अध्ययन करण्यास वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहेत. शिक्षकांना शैक्षणिक कार्यापेक्षा अशैक्षणिक कामेच अधिक करावी लागत असल्याची ओरड सर्व स्तरातून होते. या साऱ्या बाबींचा विचार करून शासनाने आता 'माहितीचा वार शनिवार' ठेवण्याचे निश्चित केल्याने शिक्षकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.