दिलासा : पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नाही

दिलासा : पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नाही

नागपूर : मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन (Rainy convention) दोनच दिवसांचे होणार आहे. त्यामुळे तारांकित प्रश्न व लक्ष्यवेधी सूचना मांडता येणार नाही. सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न, मुद्दे मांडता येणार नाही. प्रशासनाला प्रश्नांच्या स्पष्टीकरणातून मुक्ती मिळाली आहे. कोरोनामुळे अधिवेशनच कमी दिवसांचे (The convention lasted two days) घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. (The-rainy-session-has-no-starred-questions)

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत ५ जुलैपासून सुरू होणार असून, दोनच दिवसांचे राहणार आहे. कमी दिवसांचे अधिवेशन असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनात दोन-तीन विधेयक व पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहे. पुनर्नियोजनाचा विषय सुद्धा येणार असल्याचे सांगण्यात येते. अधिवेशन कमी कालावधीचा असल्याने अनेक विषय टाळण्यात आले. तारांकित प्रश्न व लक्ष्यवेधी सूचनाही घेण्यात येणार नाही.

दिलासा : पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नाही
मुलीकडे गेलेल्या सासऱ्यांची जावयाने केली गोळी झाडून हत्या

आपले मुद्दे मांडण्यासाठी सदस्यांनी विविध आयुधे देण्यात आली आहे. त्यात तारांकित प्रश्न व लक्ष्यवेधी सूचनांचा सुद्धा समावेश असल्याचे सांगण्यात येते. याच्या माध्यमातून सदस्य आपल्या भागातील प्रश्न, मुद्दे, समस्या सभागृह मांडून न्याय पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याने याच्या माध्यमातून विषयांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न होतो. अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच सदस्य प्रश्न, मुद्दे लक्षात ठेवून तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सादर करतात.

मुद्दे उपस्थित होणार असल्याने अधिकाऱ्यांवर वचक असते. विधिमंडळाला उत्तर द्यायचे असल्याने प्रशासन कामाला लागते. उत्तर सादर करायचे असल्याने अनेकदा अधिकारी संबंधित विषय मार्गी लावून घेतात. तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नसल्याने अधिकाऱ्यांना उत्तर देण्याच्या कटकटीपासून दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येते.

दिलासा : पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्ष्यवेधी नाही
वडिलांकडे हट्ट धरून काम करा; नवनीत राणांनी कशासाठी लिहिले पत्र
हे पळपुटे सरकार आहे. राज्यात अनेक मुद्दे, समस्या आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांना न्याय देता आले असते. परंतु, दोन दिवसांचे अल्प अधिवेशन आहे. कोरोनाचा विषय पुढे करून सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यांना सामान्य जनतेचे देणेघेणे नाही. आमचे लेखी प्रश्न घेऊन त्यावर कारवाई करून उत्तर दिले पाहिजे.
- प्रवीण दटके, आमदार, भाजप

(The-rainy-session-has-no-starred-questions)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com