मोताळा : दुचाकी अपघातात अंत्री येथील दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मोताळा ते नांदुरा मार्गावरील आडविहीर फाट्यानजीक शनिवारी (ता. १४) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अतुल गजानन जवरे (३०) व गोपाल भगवान काठोडे (२१) अशी त्यांची नावे आहेत. .तालुक्यातील अंत्री येथील अतुल गजानन जवरे व गोपाल भगवान काठोडे हे दोघे जण शनिवारी (ता. १४) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुचाकीने मोताळ्याकडून नांदूऱ्याकडे जात होते. दरम्यान, आडविहीर फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अतुल जवरे व गोपाल काठोडे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला..अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अतुल जवरे व गोपाल काठोडे या दोघांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.