

Nagpur
esakal
नागपूर: मॉन्सून परतण्याची आतुरतेने वाट पाहात असलेल्या वैदर्भीयांना चक्क पावसाच्या दिवसांमध्येच उन्हाचे सौम्य चटके सहन करावे लागत आहे. कोरड्या हवेमुळे विदर्भातील सरासरी तापमानात सहा अंशांपर्यंत वाढ झाली असून, काही जिल्ह्यांमध्ये पाऱ्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू आहे.