

Nagpur
esakal
नागपूर: वर्धा नदी ही अतिप्राचीन कालखंडापासून मानवी वसाहतीचे केंद्रस्थान राहिलेली आहे. महाभारत, गरुडपुराण याबरोबरच वासुदेवहिंडी या प्राचीन जैन ग्रंथातही तिचा उल्लेख आढळतो. परंतु, त्याही पलीकडे अश्मयुगीन कालखंडातही तिच्या खोऱ्यात आदिमानवाचा वावर होता हे गाविलगड टेकड्यांमध्ये असलेल्या गुहा व तेथील चित्रांवरून स्पष्ट होते. वर्धा नदी शोधयात्रेत, शोधयात्रींनी या चित्रित शैलगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अनुभव घेतला.