
- अपर्णा विचोरे-आठल्ये
‘सगळं अशुभ,अमंगळ... घेऊन जा ऽऽ गे मारबत ऽऽऽ!’ या आरोळ्यांनी दरवर्षी ''तान्ह्या पोळ्या'' च्या दिवशी आमच्या नागपूरातला महाल - इतवारी भाग दुमदुमुन गेलेला असतो. मारबत!, हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त नागपुरातच साजरा होतो. मारबत ही आम्हा नागपूरकरांची अशी ग्रामदेवता आहे की, ती या गावावर येणारी सगळी संकटे, आपल्या सोबत दूर घेऊन जाते आणि विसर्जित होते.