माझे लग्न गरीब घरात का केले? मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट

पोलिस कर्मचाऱ्यांनी बारीकीने घटनास्थळाची पाहणी केली असताना पोलिसांना महिलेने लिहिलेली डायरी सापडली
Why did I get married in a poor house?
Why did I get married in a poor house?Why did I get married in a poor house?

जलालखेडा (जि. नागपूर) : ‘ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले, तो माझ्या जीवनातील काळा दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून दिले. मैत्रिणी माझ्यापेक्षाही गरीब असताना त्यांचे लग्न श्रीमंत घरी व उच्चशिक्षित मुलाशी झाले. परंतु, माझे कुटुंब उच्चशिक्षित असूनही माझे लग्न गरीब घरात केले.’ नैराश्‍य मनात दाटल्यामुळे अश्विनी हरिदास रणमले (वय २५) हिने आत्महत्तेचे टोकाचे पाऊल (suicide news) उचलल्याचे तिच्या डायरीतील मजकुरावरून उघड झाले आहे. (Why did I get married in a poor house?)

सरकारी नोकरीवर असणारा मुलगा नवरा म्हणून मिळावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यानुसार अश्‍विनीच्या आई-वडिलांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणाऱ्या हरिदास रणमले (रा. घानमुख, ता. महागाव, जि. यवतमाळ) या मुलाशी लग्न करून दिले. २९ डिसेंबर २०२१ रोजी अश्विनी व हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटा माटात पाप पडले. लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करण्यात आला. मुलीकडील सर्व उच्चशिक्षित व नोकरीवर होते.

Why did I get married in a poor house?
मध्यरात्री गेला प्रेयसीला भेटायला; दाट धुक्यामुळे विहिरीत पडला अन्...

हरिदास हा गरीब घरातील आहे. त्याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली. त्याला सहा हजार रुपये मानधन मिळत आहे. लग्न झाल्यानंतर तो सात जानेवारीला जलालखेडा येथे राहायला आला. पती, पत्नी व अश्‍विनीची आजी जलालखेडा येथे किरायाने राहू लागले. मुलगा रोज वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जायचा व मुलगी गृहिणी असल्यामुळे दिवसभर घरी राहत होती.

रविवारी (ता. ३०) आजी परत गावी केली असता मंगळवारी (ता. १) दुपारी तीन वाजताच्या सुमारास अश्विनी हरिदास रणमले (वय २५) हिने गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली?, याचा उलगडा झाला नव्हता. उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी बारीकीने घटनास्थळाची पाहणी केली असताना पोलिसांना महिलेने लिहिलेली डायरी सापडली. डायरीत (Diary text) जे लिहिले होते, ते वाचून पोलिसांना आश्चर्यच झाले. आत्महत्या करणाऱ्या महिलेने तिचे लग्न गरीब मुलाशी झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले.

Why did I get married in a poor house?
शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका

आजी गावी जाताच लावला गळफास

आजी सोबत राहत असल्यामुळे ती असे टोकाचे पाऊल उचलू शकली नाही. आजी गावी जाताच तिने गळफास लावून आत्महत्या (suicide news) केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हरिश्चंद्र गावडे, सहकारी दिनेश हिवसे, रणजित रोकडे, सातंगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com