
Nandurbar Accident
Sakal
तळोदा : अश्वत्थामा (अस्तंबा) ऋषीच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांचे चारचाकी वाहन चांदसैली (ता. तळोदा) घाटात उलटल्याने झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर अन्य तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर तळोदा व नंदुरबार येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या अपघातात नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.