राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा!

national
national

अकोला : अमरावती ते गुजरातच्या सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प आहे. आतापर्यंत महामार्गाचे सरासरी केवळ 25 टक्के काम झाले आहे. पूर्वीच्या कंत्राटदार कंपनीने काम थांबविल्यामुळे बंद पडलेले चौपदरिकरणाचे काम नव्याने सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामार्गाचे 194 किलोमीटरचे काम चार टप्प्यात करण्यात येणार असून, त्यासाठी 33 निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण झाले असून, आता आर्थिक निकष तपासणीचे काम आठवडाभरात पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी अमरावती ते नवापूरपर्यंतचा 480.79 कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग 1 एप्रिल 2013 रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रकल्पाला मंजुरी देऊन एल अ‍ॅण्ड टी कंपनीला काम दिले होते. भूसंपादनातील दिरंगाईसह विविध अडचणींमुळे काम सुरू होण्यापूर्वीच एल अ‍ॅण्ड टी कंपनीने काम सोडून दिले. त्यानंतर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी 31 ऑक्टोबर 2015 रोजी अकोल्यात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले.

अमरावती ते चिखली 194 कि.मी. आणि फागणे ते नवापूर 140.79 कि.मी. अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार होते. अमरावती ते चिखलीपर्यंतचे (जळगाव जिल्हा सीमा) 2288.18 कोटी रुपयांचे कंत्राट आयएलएफएसअंतर्गत असलेल्या ‘आयटीएनएल’ कंपनीला देण्यात आले होते. त्या कंपनीने अमरावती ते मूर्तिजापूर, मूर्तिजापूर ते अकोला, अकोला ते बाळापूर व बाळापूर ते चिखली असे चार टप्पे पाडून इतर तीन उपकंपन्यांची नियुक्ती केली. चौपदरीकरणाचे संपूर्ण काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर असल्याने गुंतवणूकदार तयार करून 80 टक्के भांडवल तयार करण्याचे मोठे आव्हान कंत्राटदार कंपनीपुढे होते. चौपदरीकरणाच्या कामासाठी गुंतवणूकदार मिळत नसल्याने अडचणीत भर पडली. त्यामुळे आर्थिकसह विविध कारणांमुळे महामार्गाचे काम रेंगाळले. याही परिस्थितीत अमरावती ते चिखलीपर्यंतचे काम टप्प्याने सुरू करण्यात आले. काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. कसे बसे काही ठिकाणी काम पूर्ण करण्यात आले. आता जुलै 2018 पासून पुन्हा या मार्गाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदार नियुक्त करून हे काम पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. चार टप्प्यासाठी वेगवेगळ्या निविदा मागविण्यात आल्यात. त्यात 33 निविदा महामार्ग प्राधिकरणाला प्राप्त झाल्यात. त्यांच्या तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. उन्हाळ्यात हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.


असा प्राप्त झाल्यात निविदा
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी चार टप्पे पाडण्यात आले आहे. त्यात अमरावती ते मूर्तिजापूर, मूर्तिजापूर ते अकोला, अकोला ते बाळापूर व बाळापूर ते चिखली असे चार टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 10, दुसऱ्या टप्प्यासाठी 9, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 आणि चौथ्या टप्प्यासाठी एकूण 7 निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला प्राप्त झाल्यात.


राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार चार टप्प्यांकरिता 33 निविदा प्राप्त झाल्यात. त्यांची तांत्रिक निकषांवर तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. आता आर्थिक निकष तपासले जात आहे. त्यानंतर कमीत कमी रकमेची निविदा सादर करणाऱ्यांना कंपनीला कार्यारंभ आदेश दिला जाईल. या आर्थिक निकषांची तपासणी सुरू आहे. त्यानंतर बँक हमी आणि इतर तांत्रिक बाजूंची पूर्तता केल्यानंतर काम सुरू होईल.
– विलास ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक तथा महाप्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com