
आगर (जि. अकोला) : उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आगर परिसरात गत काही दिवसांपासून जनावर लंपास होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. त्यामध्ये सात शेतकऱ्यांची जनावरे लंपास करण्यात आली आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, वळू, शेळी या जनावरांचा समावेश आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
क्लिक करा- अकोल्यातील युवकाने केली ‘कोविड’वर मात!
तक्रार झाली दाखल
आगर परिसरातील कंचनपूर, बदलपूर, नवथळ, खेकर्डा, पाळोदी, गोतरा, खांबोरा यासह अन्य गावातील शेतकऱ्यांकडून जनावरे सकाळी शेतामध्ये चाराईसाठी सोडली जातात. परंतु, सायंकाळी घरी परत येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांचा शोध घेतला जात आहे. शोध घेऊनही जनावरे आढळून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये जनावर चोरणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेळ्या, गाय, म्हैस चोरीला गेल्याची माहिती आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव फुकट यांच्या मालकीची 60 हजार रुपये किंमतीची म्हैस आठ दिवसांपूर्वी आगर येथून लंपास झाल्याची तक्रार त्यांनी 21 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यांत दाखल केली होती. अद्यापही म्हशीचा शोध लागला नसल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.