१९ मार्च रोजी शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास; शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्या पठीशी आहोत

One day fast on 19th March for farmer sympathy
One day fast on 19th March for farmer sympathy

महागाव (जि. यवतमाळ) : १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. २०१७ पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी १९ मार्चला उपवास करतात.

अन्न हा जिवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात या साठी मी काय करू शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही.

आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकाऱ्याना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा दिलासा देऊ शकतो.

तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे.

हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे. आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करू शकतो. खूप केले देवा-नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱ्यांसाठी. याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू. सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.

अन्नत्याग का?

  • साहेबराव करपे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे
  • शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणे
  • शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी बळकट करणे
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करून विरोध करणे
  • शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे

पदयात्रा

डॉ. राजीव बसरगेकर यांनी ठरवले की ते ११ मार्चला औंढा नागनाथ येथे महादेवाला साकडे घालून पदयात्रा सुरू करीत. १९ मार्चला चिलगव्हाणला पोहोचतील. त्यांच्यासोबत पदयात्रा करायला अनेक जण तयार झाले आहेत. तुम्हाला शक्य असेल तर या पदयात्रेत तुम्हीही सामील होऊ शकता. पूर्ण यात्रेत वेळ देणे शक्य नसेल तर १९ मार्चला महागाव येथे या. तेथून ८ किलोमीटर चालत चिलगव्हाणला जाता येईल.

पदयात्रेचा मार्ग

औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशा सुमारे सव्वाशे कि.मी.च्या पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे ठरवण्यात आला आहे. ११ मार्च- औंढा नागनाथ- येहळेगाव- डिग्रस- कऱ्हाडे, १२ मार्च- डिग्रस- कऱ्हाडे- हिंगोली- खानापूर चिं., १३ मार्च- खानापूर चिं.- कळमनुरी- माळेगाव, १४ मार्च- माळेगाव- बाभळी- शेंबाळ पिंपरी, १५ मार्च- शेंबाळ पिंपरी- मुळावा- पळशी, १६ मार्च- पळशी-मरसुळ- उमरखेड- सुकळी, १७ मार्च- सुकळी- नांदगव्हाण- बिजोरा, १८ मार्च- बिजोरा- मुडाना- महागाव, १९ मार्च- महागाव ते चिलगव्हाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com