कांद्याने केला वांधा, आणले सामान्यांच्या डोळ्यात पाणी

onion
onion

अमरावती : सध्या भाजीपाल्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. कांदा हा तर गोरगरीबांच्या जेवणाचा आधार. तो ही खूप महागला असून त्यामुळे गरीबांचा जीव रडकुंडीला आला आहे. ऑगस्टमधील संततधार व परतीच्या पावसाने मार दिल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याचीही वाताहत झाली आहे. बहुतांश ठिकाणचा कांदा खराब झाला आहे. बाजारातील आवक मंदावल्याने भाव वधारले आहेत. अमरावती बाजार समितीत मंगळवारी गावरान कांद्याला प्रतिकिलो ३० ते ३५ तर नाशिक कांद्याला ३० रुपये प्रतिकिलो किमान भाव मिळाला.

पावसाळ्यात कांद्याचे भाव वाढतात, असा साधारण अनुभव आहे. यंदा ऑगस्टमधील संततधार पावसाने त्यावर कडी केल्याने कांदा काढता आला नाही. जमिनीतच कांदा सडू लागल्याने उत्पादनावर परिणाम होत आवक मंदावली. साठवलेला कांदा बाजारात आला आहे. अमरावती बाजार समितीत गावरान कांदा स्थानिक भागासह गुजरात व मध्य प्रदेशातून प्रामुख्याने येतो, तर नाशिक, लासलगाव, जळगाव येथून लाल कांद्याची आवक होते. यंदा ही आवक मंदावली आहे.

मध्यंतरी निर्यातबंदीचाही परिणाम जाणवला. सध्याही आवक तुलनेने कमीच असल्याचे बाजार समितीच्या भाजीपाला विभागाचे सचिव मकवाने यांनी सांगितले. सोमवारी (ता.२१) पाच ट्रक व सात टेम्पो कांदा आणि बटाट्याची आवक झाली. त्यामध्ये निव्वळ कांदा ३१० क्विंटल होता. चांगल्य प्रतीच्या कांद्याला बाजारात ३६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

कोथिंबीर ८० रुपयांवर
पावसाने कोथिंबिरीचे (सांभार) अपरिमित नुकसान झाले आहे. थोक बाजारात एका किलोला साठ रुपयांवर भाव आहे, तर किरकोळ बाजारात तो ऐंशी रुपये किलोने विकल्या जात आहे. थोक बाजारात आवक अतिशय कमी असून बहुतांश कोथिंबीर खराब झाली असल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com