
अकोला : अधिक उत्पादन घेण्याच्या नादात, विक्रेत्यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी पिकात दरवर्षी कीटकनाशकांची व तणनाशकांची वारेमाप फवारणी करीत आहे. राज्यात खरीप, रब्बी, उन्हाळी, भाजीपाला व फळपिकांची जवळपास सव्वा दोन कोटी हेक्टरवर पेरणी होते असून, त्यावर सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या कीटकनाशके व तणनाशकांची फवारणी शेतकरी करीत आहेत.